Sunday, February 26, 2012

३१ मार्च २०११ ला लिहिलेलं इमेल ..

प्रिय मित्र हरीश पोहेकरला नविन देशात आल्यावर ५ महिने उलटून गेल्या नंतर ३१.३. २०११ ला लिहिलेलं इमेल.

उल्म (जर्मनी) राठ हाउस: शहरातलं मध्यवर्ती ठिकाण
प्रिय हरीश,  कसा  आहेस ? मला माहित आहे तुला वाटलं असेल की काय आशिष कुलकर्णी ... गेल्या नंतर संपर्कात नाही...आणि अजूनही काही वाटले असेल ;).. असो. अरे मी इतका बिझी होतो इथे सुरुवातीला ४-५ महिने ..काय सांगू, साडे चार वर्षांनी पुन्हा अभ्यास,परीक्षा ... एकदम ट्यून ईन व्हायला जरा वेळ पाहिजे.. कोणाच्याच संपर्कात नव्हतो....(पण हरीश ला लिहायचं आहे हे होतं मनात कुठेतरी) आणि चाट मध्ये वैगरे होत नाहीत रे गोष्टी सांगून ...पत्र रे पत्र च !..त्यात जी ताकद ना टी चाट मध्ये कुठे ? ..आता जरा मोकळा आहे ...म्हणालं लिहावं आता हरीशला थोडं विस्तारीत पत्र...तर मला लिहिण्याचे विषय म्हणजे इथले लोक.. आणि अनुभव. तेच सांगतो तर आता..

हा !...माझं म्हणशील ना तर I am humbled after seeing people here from different parts of the world ..नक्की अंदाज येत नाही की कोण किती पाण्यात आहे याचा एकदम ... पण २-४ चायनीज मुलांशी ओळख झालीये... फार फार फार फार मेहनती असतात हि मुलं..! म्हणजे प्रत्येकात एक आक्रमक dragon आहे असं वाटतं मला ! पण एकाच थिंकिंग प्लेन वर आहेत की नाही माहित नाही.. मला मी जिथं आहे तिथून जसं दिसतंय ते सांगतो..चीनच्या आणि भारताच्या शिक्षण पद्धतीत जमीन आसमानाचा फरक आहे .. चीन भारता पेक्षा जवळपास सगळ्यात क्षेत्रात पुढे आहे असा मला फील येतोय.. आपल्या शिक्षण पद्धतीत गंभीर उणीवा आहेत....हे मला वारंवार अनुभवाला येतंय ..

  "मूळ शिक्षणाचा दर्जा हा त्या माणसाच्या वैचारिक आणि त्यायोगे येणाऱ्या कृतीचा आणि पर्यायाने आयुष्याचा दर्जा ठरवत असतं ! गोष्टी जेव्हा 'जग' या पातळीवर येतात ना.. तेव्हा मूळ शिक्षण हीच गोष्ट सगळ्यात मुलभूत ठरते.. हे वाचणं वेगळं आहे .. आणि अनुभवणं वेगळं " 

सध्या चायनीज एकाच गोष्टी मुळे मार खात आहेत की इंग्लिश नीट बोलता येत नाही .. आणि (पाश्चिमात्य) जग चीन ला, कम्युनिस्ट असल्या कारणाने, एन-केन कारणाने एकट पाडायचा विचार करतं (जसं की खोचक पणे गेल्या वर्षी चीन ला शांततेच नोबेल दिलं...Nobel Peace Prize for 2010 to Liu Xiaobo for his long and non-violent struggle for fundamental human rights in China...) आणि चीन कसा जगासाठी फक्त कारखाना आहे आणि भारत म्हणजे कसा दोघात संशोधनासाठी अधिक चांगला देश आहे असं भासवत आहे ...पण असं नाही..हे लोक पुढे आहेत नक्कीच... मी म्हणेन ९९ टक्के भारतीयांना माहित नाहीये चीन काय चीज आहे ते...! भारतीय अजूनही झोपेत आहेत असं मला वाटतं ! Literally all .. all wrong things come up in Democracy...आणि आपल्याकडे तर उच्छाद मांडलाय ... china is single point clear mentality and it shows in their each indivdual कोणा इतर कडून काही नाही पण मी ह्या चीनी विद्यार्थ्यांकडून बरंच काही शिकतोय..! हो पण हे लोक कधी कधी 'एक्स्ट्रा स्मार्ट' असू शकतात ! आणि I am not in the awe of chinese ...I never will be of anything ...but some things are revealed to me which are stunning ..& I know this is not the full picture yet .

Hirschegg (ऑस्ट्रिया) 
जर्मन लोक/विद्यार्थी जर म्हणाले तर एक गोष्ट त्यांच्या मानसिकतेत असल्याचे प्रकर्षाने जाणवते ... utter lack of self disrespect ...किंचितहि न्यून गंड नाही... म्हणुन काही हे लोक मनात जे येईल ते स्पष्ट आणि शुद्ध शब्दात बोलून दाखवतात... दांभिकता तर शोधून सापडत नाही ...जर्मन भाषा जशी खूप logical आहे..तसं ती यांचात तेच उतरवते.. एकूणच हे लोक विचारांच्या दृष्टीने अगदी कमीत कमी ढोंगी, कमी गोंधळलेले, अधिक प्रांजळ , अधिक कृतज्ञ , व्यवस्थित-रोख ठोक, शिस्तबद्ध आणि (कधी कधी अधिक) अभिमानी वाटतात..! म्हणजे इतकं पुरेसं आहे की, जरी कोणी लगेच ..फार थोर वैचारिक पातळीचा नसला तरी ..म्हणजे तशेही इथ नक्कीच असतील, आहेत .. पण तसं दाखवायला ते जात नाहीत ! त्याचा समोरच्याला विचार करण्याचा वेळ / संधी देतात.. ह्यात जास्त मजा आहे ! कसल्याही गोष्टी वर पांघरून घालणे असला प्रकार बिलकुल नाही.. जे आहे ते आहे.. बावळत अजिबात वाटत नाहीत..! मला वाटतं प्रामाणिक पणा आणि स्पष्ट वक्तेपणा, निर्भीडता, चूक असेल तर लगेच माफी मागून दुरुस्त करण्याची तयारी हे प्रमुख गुण..! गुणांशिवाय कोणताही देश किंवा व्यक्ती प्रगती करूच शकत नाही.. आणि प्रत्येक नागरिकात जर हे गुण आहेत तर देश प्रगती केल्या वाचून राहात नाही ..ह्याचे जर्मनी हे सगळ्यात जबरदस्त उदाहरण वाटतं मला ..! .. इतके punctual की यांचा जगणं म्हणजे पण एक world record आहे.. खरंच :) !

तसं बघितलं तर बरंच काही शिकण्या सारखंच आहे ह्या लोकांकडे ..अगदी 'पुरुषा नेही' संडास कसा स्वच्छ ठेवावा पासून आणि संशोधनासाठी दृष्टीकोन कसा असावा पर्यंत ...विशेषत: भारतीय पुरुषांसाठी तरी खूपच उत्तम अनुभव..स्वच्छतेच्या दृष्टीने...आत्तापार्यान्तच्या आलेल्या अनुभवावरून तरी जर्मनी साठी कौतुकच कौतुक आहे माझ्याकडे..! म्हणजे त्यांच्या गाड्या घोड्यांमुळे नाही...पण मुळात ... त्यांचे लोक पाहा कसे आहेत ह्यामुळे ....मी सतत विचार करत असतो की ह्यांचा mind set कसा असेल ते...बाकी आपोआपच सृष्टीच्या विधानानुसार होतं..! ज्याच्याकडे गुण आहेत ..त्याच्या कडे सगळं आहे..! ह्या लोकांच्या राहणीमानाबद्दल सांगायचं तर ..एकदम उच्च आहे रे ..मला तरी फरक वाटला खूप .. हे लोक दररोज नवे ड्रेस आणि चपला बूट घालतात की काय अशी शंका यावी ! पण असं नाही ..ते तेवढं स्वच्छ ठेवतात सगळं ...दिसायला धष्टपुष्ट असतात सगळेच.. आणि भारतात मला कोणीतरी म्हणाल होतं की जर्मन स्त्रिया ह्या पुरुषांप्रमाणेच अन्गापिंडान/चेहऱ्याने असतात .. पण अस काही नाहीये.. काही काही असतात .. विचित्र वाटतात आपल्या नजरेला..पण आता विशेष नाही वाटत ... हा पण बऱ्याच मुली सुंदर असतात दिसायाला ..नितळ गोरे पणा आणि नाकी डोळे नीटस.

सुंदरच जर म्हणल तर दिसायला तुर्कीस्तान च्या मुली देखण्या असतात ! बोलायला पण स्ट्रेट फोरवर्ड..फुकट आढे वेढे नाही..! जर्मन मुलींबद्दल अजून एक गोष्ट म्हणजे , ह्या सर्रास सिगारेटी ओढतात .. म्हणजे माझ्या निरीक्षणानुसार मुलीच जास्त ओढताना दिसतात मुलांपेक्षा .. अजून एक गोष्ट, ही जर्मन लोकान बद्दल नाहीये पण इस्लामी मुलींबद्दल आहे..! इस्लाम मध्ये जर दारू पिणे सिगारेटी ओढणे ह्या गोष्टींसाठी पुरुषालाही मज्जाव आहे .. पण इथे आमच्या वर्गातल्या इराणी मुलीला (टी इस्लामीच असावी) सराईतपणे सिगारेट ओढताना पाहिलंय आणि एक तुर्किश मुलगी आहे ... तिला आमच्या वेलकम रिसेप्शन मध्ये शाम्पेन पिताना पाहिलंय....म्हणजे ह्या मुली नॉर्मल/सरळ वाटतात बोलायला ...आगाऊ असही नाही ... मला ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत .. हे लोक जर कट्टर .. तर ह्या अश्या त्यांच्या धर्मा पलीकडच्या गोष्टी चार चौघात करण्यास कसं काय धजतात.. म्हणजे मी खूप धार्मिक आहे अस नाही पण.. हे लोक स्वताहाला म्हणवतात म्हणुन प्रश्न पडतो ड्युअल वागणुकीचा ! म्हणजे जगात नेमकं चाल्लय तरी काय, असो पुढे मागे त्यांच्याशी संवाद साधता आला तर हा प्रश्न/शंका (टीका म्हणुन नाही) मी विचारणार आहे त्यांना ! बघू काय उत्तर मिळतं ते !

१८ ऑक्टोबर २०१० : क्लास ट्रीप ऑस्ट्रीअन आल्प्स पाहण्यासाठी गेलो असतानाचा 
तुला सांगितलं होतं बहुतेक की .. आम्ही वर्गात १०+ वेगवेगळ्या nationalities आहोत ते.. पण ... मित्र-मैत्रिणी : सध्या फक्त ओळखी होत आहेत...मैत्री वगैरे म्हणजे कितपत होईल आणि कितीक दृढ होईल ह्याबद्दल मला जरा शंकाच आहे..! हि एक गोष्ट जरा अनपेक्षित होती... इथे सगळे मोकळे आहेत तसे .. पण मैत्री साठी जो दिल खुलासपणा (ढिल्लेपणा नाही) असावा लागतो तो अजून कुठे सापडला नाही.. वागण्या बोलण्यात जरा कृत्रिमता आणि मोजून मापून बोलण्याची तऱ्हा आहे ! चूक काहीच नाही..पण मैत्रीच्या दृष्टीने अजून वातावरण तसं ठीकच आहे..! वर्गात ज्या देशातले मुलं जास्त ते आपापसात असतात (चीनी , इराणी).. त्यांना इतरांची गरज नाही... साहजिक आहे..!

मी आणि मागे हिर्शेग्ग (ऑस्ट्रिया) येथील निम-बर्फ़ाच्छादित पर्वत , ऑक्टोबर २०१० 
माझ्यातही बदल होतच आहेत की... पण काय आणि किती लिहावं याला मर्यादा नाहीत.
इथल्या प्रत्येक गोष्टी बद्दल नविन विचार येतात मनात ..त्याची आपल्या इथल्या भौतिक, सामाजिक वातावरणाशी आणि मानासिकतेबरोबर तुलना, हे आजकाल रोजचच होऊन बसलय.. पुन्हा त्यावरची मतं ...चालूच सतत ..... पण तरीही पुन्हा कळवेल तुला सविस्तर..

तुझा मित्र,
आशिष कुलकर्णी